शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

कॉँग्रेस आघाडीत ‘एमआयएम’ नसेल: पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:47 IST

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, स्वाभिमानी, भारिप, शेकाप, जनता दलासह दहा पक्षांची ...

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, स्वाभिमानी, भारिप, शेकाप, जनता दलासह दहा पक्षांची महाआघाडी आकारास येत आहे. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आघाडीचे घटक असतील. त्यांनी कुणाशी आघाडी करावी, हा त्यांचा प्रश्न असून, काँग्रेसच्या व्यासपीठावर मात्र ‘एमआयएम’ला स्थान नसेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.पृथ्वीराज चव्हाण हे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. कॉँग्रेस कमिटीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण म्हणाले, केंद्र व राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून, ते पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण करील, अशी सध्या तरी परिस्थिती नाही.नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यस्था कोलमडली आहे. अर्थव्यवस्था २.५ टक्क्यांनी घसरल्याने चार लाख कोटींनी देशाच्या उत्पन्नात घट झाली, याला नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. रिझर्व्ह बॅँकेच्या संचालक मंडळाची सोमवारी (दि. १९) बैठक आहे. यामध्ये मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे.‘राफेल’मध्ये तर मोदींनी देशाची फसवणूक केली असून, ६७० कोटींचे विमान १६७० कोटींना कसे खरेदी केले? हा भ्रष्टाचार नव्हे काय? भाजपचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे धार्मिक दुहीचा वापर करणार असून राममंदिर, खरे-खोटे हल्ले करणे, शहरांची नावे बदलणे, आदी उद्योग सुरू आहेत; पण एकाच मुद्द्यावर एकदाच यश मिळते. मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असून, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची वाट पाहत असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होणार आहे.सरकार-रिझर्व्ह बॅँकेत संघर्षनोटाबंदीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बॅँकेच्या संचालक मंडळालाही विश्वासात घेतले नाही. अतिशय गुप्त असणारा संचालक मंडळाच्या सभेचा कार्यवृत्तांतही बाहेर आला. रिझर्व्ह बॅँकेकडून केंद्र सरकारने कायदा कलम ७ नुसार हजारो कोटींची गंगाजळी मागितली आहे. रिझर्व्ह बॅँकेची स्वायत्तता धोक्यात आल्याने सरकार व रिझर्व्ह बॅँकेत संघर्ष सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.