शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

कॉँग्रेस आघाडीत ‘एमआयएम’ नसेल: पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:47 IST

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, स्वाभिमानी, भारिप, शेकाप, जनता दलासह दहा पक्षांची ...

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, स्वाभिमानी, भारिप, शेकाप, जनता दलासह दहा पक्षांची महाआघाडी आकारास येत आहे. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आघाडीचे घटक असतील. त्यांनी कुणाशी आघाडी करावी, हा त्यांचा प्रश्न असून, काँग्रेसच्या व्यासपीठावर मात्र ‘एमआयएम’ला स्थान नसेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.पृथ्वीराज चव्हाण हे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. कॉँग्रेस कमिटीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण म्हणाले, केंद्र व राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून, ते पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण करील, अशी सध्या तरी परिस्थिती नाही.नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यस्था कोलमडली आहे. अर्थव्यवस्था २.५ टक्क्यांनी घसरल्याने चार लाख कोटींनी देशाच्या उत्पन्नात घट झाली, याला नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. रिझर्व्ह बॅँकेच्या संचालक मंडळाची सोमवारी (दि. १९) बैठक आहे. यामध्ये मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे.‘राफेल’मध्ये तर मोदींनी देशाची फसवणूक केली असून, ६७० कोटींचे विमान १६७० कोटींना कसे खरेदी केले? हा भ्रष्टाचार नव्हे काय? भाजपचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे धार्मिक दुहीचा वापर करणार असून राममंदिर, खरे-खोटे हल्ले करणे, शहरांची नावे बदलणे, आदी उद्योग सुरू आहेत; पण एकाच मुद्द्यावर एकदाच यश मिळते. मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असून, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची वाट पाहत असल्याचे सांगत चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होणार आहे.सरकार-रिझर्व्ह बॅँकेत संघर्षनोटाबंदीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी रिझर्व्ह बॅँकेच्या संचालक मंडळालाही विश्वासात घेतले नाही. अतिशय गुप्त असणारा संचालक मंडळाच्या सभेचा कार्यवृत्तांतही बाहेर आला. रिझर्व्ह बॅँकेकडून केंद्र सरकारने कायदा कलम ७ नुसार हजारो कोटींची गंगाजळी मागितली आहे. रिझर्व्ह बॅँकेची स्वायत्तता धोक्यात आल्याने सरकार व रिझर्व्ह बॅँकेत संघर्ष सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.